सर्वांनी जरूर वाचावे....... खास विनंती


परवाच एका स्फोटात मेलो.
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो.
स्वर्गात जाताच टिळक भेटले.
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले.

टिळकांनी विचारले, स्वातंत्र्यानंतर बदललय का काहि ?

म्हटल छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाहि.
आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो.
पण आझाद मात्र काश्मीर होतो.

दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो.
म्हटल तात्या आज जन्माच पुण्य पावलो.
ते म्हणाले, सध्या तरी सगळ निवांत आहे.
स्वर्गात काँग्रेसवाला नाहि तर सगळ शांत आहे.
त्यांनाच विचारले तात्या इथे शिवराय कुठे राहतात.
म्हणाले ते, पहा सौधातुन आपल्याकडेच पाहतात.
छत्रपतीँचा विजय असो म्हणुन चटकन हात जोडले.
पण घडले भलतेच, ते मझ्यावरच ओरडले.
काय रे ? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमीजी केली.
तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली ?
मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती,
आणि महाराजाची नजर माझ्यावरुन ढळत नव्हती.
मी म्हणालो, कबुल आहे महाराज तुमची स्वप्न आम्हाला कळलीच नाही.
पैसा सोडुन आमची नजर दुसरीकडे वळलीच नाही.
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके आवाज हेरतात,
ब्र म्हणायचा अवकाश लगेच गाढवाचे नांगर फिरवतात.
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो.
हे सगळे ऐकुन महाराजांच्या गालाचे कल्ले थरारले,
आमच केविलवाण जग पाहून डोळ्यात पाणी तरारले.
क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,
आणि मग आमच हे अस वगण बघुन रागाने बिथरले.
पाय लटपटले मला वाटले आता कंबख्ति भरली म्हणुन समज,
चुकिची शिक्षा गर्दन मारलीच म्हणुन समज.
पण मेलेल्यांना मारायला ते खुर्चीतले नेते नव्हते,
न्याय कठोर असले तरि ह्रदय त्यांचे रीते नव्हते.
मान खाली घालुन तसाच पुढे गेलो.
अहम आश्चर्यम स्वर्गात मला औरंगजेब भेटला,
म्हणे काफरांना मारुनच तर स्वर्ग गाठला.
जिन्हा सुद्धा तिथेच होता.
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल,
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल.

त्याला म्हणालो जरी स्वर्गाची फाळनी होनार आसेल
तरी 55कोटी द्यायला गांधी स्वर्गात नसेल
तुम्ही आजून किती मागनार दूस~यांकडून आडोसे
ईथे पून्हा जन्म घेतील हजारो नथुराम गोडसे
त्याला मूतोड जवाब देवून तसाच पुढे निघालो
स्वर्गात मला महात्मा फुले भेटले
त्यांना पाहून डोळ्यात माझ्या आश्रूंचा सागर दाटला
कस सांगु तूम्हाला खाली आता शिक्षनाचा काळा बाजार थाटला
हे सर्वजन रात्री मला एकत्र भेटले .
आजच्या माणसाची व्यथा ऐकुन रागाने पेटले
ते म्हणाले,
आम्ही केलेल्या कार्याला काहीच नाही का अर्थ ?
आमचे प्रयत्न, आमचे बलीदान सगळेच कसे गेले व्यर्थ ?
शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातच भ्रष्टाचार कसा काय आला
माणसाच्या स्वार्थी वृत्तीमूळे सामान्य माणूस पूरता बेजार झाला
मंदिर, मुर्ती, पुतळे बांधुन देवधर्म तुम्ही करता
पण माणसातील खऱ्याखूऱ्या देवालाच तुम्ही  पुन्हा पुन्हा मारता
सर्व जीवांमध्ये मानवाला सर्वात श्रेष्ठ बनवल
पण या माणसानेच आज माणसातील माणुसपण नष्ट केल
बोलताना वाईट वाटते पण आता वेळ आली आहे विचार करण्याची
खरच चुकी केली का माणूस हा प्राणी बनवण्याची
बोलून बोलून थकले आणि झाले सगळे शांत
असे वाटले मरण त्र आलेच होते पं हा आहे कायमचा एकांत

अजूनही वेळ गेली नाही सुधारा आपले आयुष्य
नाहीतर मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल
फक्त आणि फक्त मनुष्य ..........!!

1 टिप्पणी:

  1. नमस्कार मी सौरभ वैशंपायन.

    ही कविता आपल्याला कुठुन उपलब्ध झाली हे समजू शकेल का?

    ह्यातली मुळ कविता माझी असून मी ती माझ्या ब्लॉग वरती १० एप्रिल २००७ रोजीच प्रकाशित केली होती.
    http://sahajsuchalamhanun.blogspot.in/2007/04/blog-post_10.html

    ही कविता निनावी अथवा तोडून मोडून, अथवा वरील प्रमाणे विनाकारणच भर घालून सगळीकडे पसरवली जाते आहे.

    आपल्याला ही कविता वापरायचीच असल्यास मुळ कविता वापरावी व ह्या कवितेखाली ती मूळ जशी आहे तशी करुन कृपया माझे नाव द्यावे अथवा ही कविता इथून काढून टाकावी अशी विनंती मी करतो आहे.

    हा प्रकार infringement of copyright of intellectual property ह्या सदरात येतो व कॉपीराइट कायद्या अंतर्गत हा अत्यंत गंभीर गुन्हा ठरतो ह्याची जाणीव आपल्यास असेल.

    Nothing personal! but every word i wrote, i believe those are my children. If anyone using them withount my permission or without my name ... it makes me furious & it is irritating as well. As a blogger please try to understand my point of view.

    जवाब देंहटाएं

Related Posts Plugin for WordPress, Blogger...